स्त्री मुक्ती असावी पण त्यात आपली बायको सून मुलगी बहीण ?

माणसाचा जन्म कोणत्या कुटुुंबात व्हावा हे त्याच्या किंवा तिच्या हातात नसतं. माणूस विशिष्ट कुटुुंबात अनवधानाने जन्म घेतो व त्याचा पुढील प्रवास सुरू होतो.माणूस ज्या कुटुुंबामध्ये जन्म घेतो त्या कुटूंबाला जातीचे-धर्माचे कंगोरे असतात. कुटुंब हा समाजाचा भाग असल्याने समाजानुसार भौतिक प्रश्न बदलतात. स्वाभाववकपणे व्यक्तीची जडणघडण बदलते.माझा जन्म असाच पूवााश्रमीच्या दलित व सध्याच्या बौध्द कुटुुंबातील. कुटुुंबाला चळवळीचा वारसा.आई वडील शिक्षक.शिकलेली पहिली पिढी. आई वडिलांकडून बाबासाहेब, सावित्रीबाई ऐकत आम्ही मोठे झालो. बाबासाहेबांच्या जयंतीला दहा वर्षांची असल्यापासून आई वडील व्याख्यानांना घेऊन जायचे. त्यामुळे एक वैचारिक दिशा भेटत गेली. सामाजिक जाणीव वाढीस लागली. पुढे पुण्यात कॉलेजमध्ये आल्यानंतर वाचन वाढलं. नवे विचार प्रवाह समजले, अनेक परिवर्तनवादी चळवळीशी संपर्क येत गेला व त्यातून सामाजिक जाणीव पक्की होत गेली. समाजात परिवर्तन झाले पाहिजे व या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात आपला सहभाग असला पाहिजे हे पक्के झाले. इतर उच्चजातीय , उच्चवणीय मुलामुलींसारखे सामाजिक कार्य हे काय छंद किंवा हौस नसून ती आपली एक जबाबदारी आहे. आपले कर्तव्य आहे हि समाज यायला फारसा वेळ लागला नाही.कारण आजूबाजूचे वातावरण हे कास्ट मर्डर,दंगल, ऍट्रॉसिटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या घटनांनी भयांकित करून टाकणारे होते. काम करायच तर काय करायच पण कस करायच हा भला मोठा प्रश्न होता.यासाठी सुरवातीला मी सुरुवातीला सिव्हिल सर्विसेस चा मार्ग स्वीकारला पण या टिपिकल पाठांतरवादि परीक्षांशी माझा ताळमेळ बसेना. शासन व्यवस्थेत घुसून काहीतरी करता येईल अशी माझी अशा होती पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले.

मग पुन्हा LLB करण्याचा निर्णय घेतला. वकील होऊन समाजाचेप्रश्न सोडवू शकतो असे वाटत होते, मग लॉ कॉलेज मध्ये एडमिशन घेतले. याचबरोबर झोपडपट्टी भागात शैक्षणिक काम करायला सुरवात केली. यावेळी वय 24 च्या घरात असल्याने आई वडिलांची “धाकधुक” वाढू लागली. सांगलीच्या सामंती मानसिकतेचा काही प्रमाणात पगडा त्यांच्यावर देखील आहे. आईवडील आंतरजातीय अथवा लव्ह मॅरेज साठी तयार होते पण अस काही नसल्याने तसं घरी सांगितलं.

माझा शिक्षण सुरू असल्याने विरोध सुरू होता. पण त्याुंना कामाबद्द्ल , माझ्या विचारांबद्दल कल्पना होती त्यामुळे पाठिंबा देणारा मुलगा व कुटुुंब बघू असं आश्वासन त्यांनी दिलं व माझ्या नकळत विवाहस्थळांवर माझे नाव नोंदवले.स्थळे येऊ लागली, पण माझे शिक्षण आर्टस् मध्ये असल्याने लोकांनी नाकारायला सुरवात केली. कारण B.A केल म्हणजे काहीतरी फालतू शिक्षण घेतलंय असं लोकांना वाटत होत. आजच्या बाजारू नवउदारमतवादी समाजात इंजिनिअर,डॉक्टर, सी ए , बँकर या नोकऱ्यांचा बोलबाला आहे.  भलेही खूप मोठ्या पगारा ची नोकरी मिळकत नसली तरी या पदव्यांना “सामाजिक प्रतिष्ठा” आहे.मुलीने लग्नानंतर नोकरी केली नाही तरी चालेल पण आमचा मुलगा इंजिनिअर आहे तर त्याला इंजिनिअरच मुलगी पाहिजे असा पालकांचा सूर असायचा. खरंतर मला समाजशास्त्राची आवड असल्यामुळे मी डिग्रीसाठी हा विषय निवडलेला. इतर विद्यार्थ्यांइतकाच अभ्यास केलेला, मग आर्टस् हि विद्याशाखा निवडण्यामध्ये चुकीचं काय? हा प्रश्न संभवत राहायचा. या बरोबरच लोकांना सामाजिक कार्य बद्दल शंका असायची. सामाजिक काम मग ‘घरचा स्वयंपाक’ कोण करेल? असे प्रश्न असायचे. मुलगा एवढे कमावतो मग सामाजिक कामाची वगैरे काय गरज? सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल एक नकारात्मक सूर येथील मध्यमवर्गात आढळतो. ते म्हणजे कामधंदा नसणारे, मोर्चा आंदोलनात दिसणारे, समाजाच्या जीवावर जगणारे, पैसा खाणारे, तर महिला या चारित्र्यहीन.. घरदार सोडलेल्या घटकांसोबत आपली बायको, सून राहणार म्हणजे काहीतरी भयंकर पाप घडणार अशी समस्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसायची.

सौन्दर्याच्या पितृसत्ताक संकल्पनेत अडकलेला वर्ग दिसण्याला खूप महत्व द्यायचा. साडी वरचे फोटो पाठव, हा तुझा व्हाट्सअप चा DP जुना आहे की रीसेंट आहे, सगळेफोटो जीन्सवरच का? ट्रेडिशनल घालत नाही का ? स्वयंपाक येतो का ? तुझे केस लहान म्हणजे तू मॉड मग आई वडिलांना सांभाळणार का? मुलं सांभाळणार का? या प्रश्नांची सरबत्ती व्हायची .काहीजण तर ओळख नसताना देखील विडिओ कॉल करायचे. याच सोबत अनेक जणांनी माझ्या वकीलीच्या शिक्षणावरून वाद निर्माण केला. मुलगी वकिलीचे शिक्षण घेते तर ती उद्या घरात येऊन आम्हाला कायदा शिकवायला लागेल असे एका पालकांनी तोंडावर बोलून दाखवले.तर आम्हाला B.COM B.A करणारी पण मुलगी चालेल पण law करणारी नको असं एकाने फोनवर सांगितले. “काय हो तुमची मुलगी कशाला सामाजिक कार्यात भाग घेते?”आधी तिने स्वतःचे करिअर करावं, लग्न करून सेटल व्हावं असे टोमणेवजा सल्ले आई वडिलांना सुनवायला सुरुवात झाली. माझ्याशी बोलण्याआधी माझी फेसबुक प्रोफाईल चाळून चित्र विचित्र प्रश्न लोक उभे करायचे. काही पालक इतके वर्ष पुण्यात राहते, काय केलं याचा गणिक हिशोब मागायचे. काहींना मी स्वैर वाटायचे, काहींना उद्धट , तर काहींना आक्रमक … मध्यंतरी एकाने विचारलं “पुण्यात कार्यकर्त्यांच्या धरपकडी सुरू आहेत एल्गार परिषदेत यात तुझा सहभाग नाही ना ? म्हणजे तुझ्यावर केसेस वगैरे नाहीत ना ? ..

सुरवातीला हा प्रकार खूपच त्रासदायक होता.ज्या समाजासाठी आपण काम करायचा विचारकरतो त्या समाजातील एक घटक आपल्याला अशा प्रकारे झिडकारेल अस कधीच वाटल नव्हत. याकाळात दोन प्रकारचे लोक भेटले एक वर्ग असा होता ज्याने कामाला उचलून घेतले, प्रशंसा केली मदत केली प्रोत्साहन दिले तर दुसऱ्या वर्गाने झिडकारले, तुझ काम ठीक आहे ग पण आमच्या घरात अशी मुलगी नको बा ….या परिस्थितीचा मानसिक त्रास आई वडिलांना अधिक होऊ लागला कारण पहिली बातचीत त्यांच्याशी व्हायची व ते त्यांचा राग माझ्यावर काढायचे. तू पण डॉक्टर इंजिनिअर झाली असतीस तर? तू हे केल असतस तर ? तुझ सामाजिक काम थांबवलस तर ?

या काळात मानसिक स्वास्थ्य बिघडून जायचं आपल्या विशिष्ट पदवीमुळे. आपले स्वतंत्र विचार, सामाजिक कामातील सहभागामुळे आपण नाकारले जातोय हि भावना मनाला खाऊन टाकणारी होती, रात्र रात्र झोप लागत नसायची,तब्येत बिघडायची.पण समविचारी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे गाडी पुढे सरकत रहायची. आता मात्र या सगळ्याची सवय झाली आहे. इतर मैत्रिणींचे अनुभवही फार काही वेगळे नाहीत. खरतर दोन व्यक्तीचे सहजीवन हे त्या दोघांमधील समजूतदारी, एकमेकांचे स्वभाव पूरक असणे यावर अवलंबून असते. डिग्री, पैसा, घरदार गाडी, दिसणं या गोष्टी दुय्यम असतात.मात्र नाम-फेम पैसा या भांडवली मूल्यांना कवटाळलेल्या वर्गाला विशिष्ट विद्याशाखेत शिक्षण घेतलला माणूस “ढ” कींवा यूजलेस वाटतो. येथील नवउदारमतवादी ब्राह्मणी व्यवस्थेचे प्रारूप अस आहे की येथे विशिष्ट कामाला, शिक्षणाला किंमत आहे.कायद्याचं शिक्षण घेण्यामागे सामाजिक न्यायाचा विचार असतो हे येथे पटवून द्यावेलागते. मुलीची शिक्षण घेण्यामागची भूमीका ही स्वतःला व कुटुुंबाला उध्वस्त करून टाकण्यासाठी नसते हेही समजावून सांगावे लागते.मुळात व्यक्ती ज्या व्यवस्थेमध्ये वाढते त्या व्यवस्थेच्या मूल्यांना नकळत आपलंस करू लागतो.यामुळे प्रतिगामीत्वाचा विरोध करत असताना आपल्याकडून या मूल्यांचे समर्थन होऊ नये यासाठी सर्वांनी सजग असले पाहिजे.

मुळात सामाजिक भान असलेले घटक समाजा साठी लढत असतात.जे आपल्या पूर्वजांच्या वाट्याला आलं ते आपल्या समाज बांधवांच्या-भगिनींच्या वाट्याला येऊ नये असं त्यांना वाटत असतं. लोक स्वतःचा पैसा, इच्छा, मौजमजा यांचा त्याग करत सामाजिक कार्यात भाग घेत असतात.पराकोटीची गुलामी भोगलेल्या समाजातून आज आपण स्व मेहनतीने तसेच आपल्या पूर्वजांच्या उच्च पदावर पोहचलो आहोत.पण याचवेळी उर्वरित समाजाला सोबत घेउन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.हे त्यांनी जाणलेले असते.आज आपण घेत असणारी स्कॉलरशिप ,फ्रीशिप,आरक्षण व इतर योजनांचा लाभ हे टिकवून ठेवण्यासाठी या व्यक्तीचा भला मोठा वाटा आहे.तेव्हा मदत नाही केली तरी ठीक पण या व्यक्तींचा आपण सन्मान ठेवला पाहिजे. मुलगा व मुलगी दोघे समान आहेत अस जर आपण मानत असू तर मुलींच्या सार्वजनिक जीवनातील कामावर आपण इतके निर्बंध का घालतोय याचाही आपण विचार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या चळवळीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता तर आज आपल्याला आपल्या कुटुुंबातील स्त्रियांचा सहभाग नकोसा का वाटतो ? सामाजिककार्य म्हणजे काय फक्त दंगे, मोर्चे , आंदोलने असतात का? असाही प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.

आजची परिस्थिती पहिली तर खाजगीकरण उदारीकरणाच्या धोरणांमुळे शासकीय नोकऱ्या, शासकीय महाविद्यालये कमी होत आहेत. शिक्षण महागडे होत आहे .पैसा असेल तर शिका ही परिस्थिती बळावत चालली आहे.रोजगार घटत गेल्याने कमीत कमी पगारावर राबवून घेतले जात आहे. तुम्ही डॉक्टरेट (Ph.D)असाल तरी नोकरी मिळेल याची खात्री नाही.तुम्ही इंजिनिअर आहात पण नोकरीची शास्वती नाही. अंतरजातीय विवाह केला तर तुमचा खून करण्यापर्यंत लोकांची मजल जाते.तुम्ही काय खावे काय खाऊ नये हे सरकार ठरवते. अशा स्थितीत एक तर सरकारच्या भेदभावजनक धोरणांविरुद्ध लढा किंवा निमूटपणे सहन करा असे दोनच पर्याय आपल्यासमोर आहेत.

ह्या परिस्थितीविरुद्ध आपण संघर्ष केला नाही तर कदाचित आपल्या पुढच्या पीढीला शिक्षणापासून,रोजगारापासून तसेच मूलभूत गरजांपासून वंचित राहावं लागेल व भेदभाव इतका पराकोटीला जाईल की रोहित वेमुला, नजीब,उना, भीमा कोरेगाव, अमृता प्रणय सारख्या घटना रोज घडू लागतील.व कदाचित यात आपलाही बळी जाईल. तेव्हा समाजाचा एक घटक या नात्याने आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई,फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसेच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे.तेव्हा ‘शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात ‘ किंवा ‘स्त्री मुक्ती असावी पण त्यात माझी बायको सून मुलगी बहीण नसावी असा उपटसुुंभा ववचार करून कस चालेल?

~~~

भाग्येशा कुरणे: आंबेडकरी कार्यकर्त्या, साऊ-रमाई शैक्षणिक प्रकल्पाच्या सह-संस्थापक आहेत, आणि पुण्यातील ILS law College मध्ये चे शिक्षण घेत आहेत.

4 Comments

  1. Faar ch parkhad ani utkrusth lekh aahe! Samajatil pariristhitiche swabubhawatun aalele he vishleshan timely aahe! Thanks for writing!

  2. छान ,आणि अप्रतिम अस मांडणी ,फक्त इंजिनिअर बद्दल एवढं नकारार्थी राहू नका ,आम्ही पण आमच्या परीने चळवळी ला हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे ….परत अभिनंदन उत्तम लिखाणाबद्दल …जय भीम जय संविधान

  3. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे,स्री मुक्ती असावी पण ,त्यात माझी बायको, बहिण,आई नसावी! हा नवीन विचार मनाला खरंच खूप भावला!
    कायद्याची विद्यार्थी आहे याचा खूप अभिमान वाटला! लग्न नसेल केलं तर सून म्हणून स्विकारण्याची तयारी आहे!

Leave a Reply

Your email address will not be published.


*