गुणवंत सरपाते

कसलं भारिये ना!!
रिहानाच्या एका ट्विटवर तेंडुलकर पासून ते मंगेशकर सगळी बामणं पटापट आली आपलं ‘सार्वभौम साम्राज्य’ वाचवायला. लोल. हे साम्राज्य ‘लोकशाही राष्ट्राच्या’ झुल पांघरलेल्या रुपात असंच बिनबोभाट टिकून राहावं ह्यात मूठभर बामण-सवर्ण वर्गाचा जितका फायदा आहे तेवढा कुणाचाच नाहीये.
गावकुसापासून ते रानामाळात पसरलेल्या चार हजार जातींचा देश आहे सर हा. इथं मीडिया, प्रशासन, न्यायपालिकेपासून ते प्रत्येक भांडवलावर फक्त चारपाच बामण-सवर्ण जातींचं अधिपत्य. जगण्याच्या हरएका संसाधनांवर ह्याच मूठभर जातीचं पिढ्यानपिढ्या पासूनचं वर्चस्व. बाकीच्याकडं कसलं प्रिव्हलेज सोडा, त्याचंतर थेट माणूसपण नाकरलेलं. मग ते उपाशी मेले, हजारो मैल पायपीट करून मेले, का ह्यांच्या वर्चस्व विरुद्ध लढत मेले ह्याचा ‘देश’ ह्या नावाखाली उभ्या असलेल्या साम्राज्याला काडीचाही फरक पडत नसतोय.
असो. आन आपण चर्चा करतोय दर पाच वर्षानी येणाऱ्या ‘पंचवार्षिक’ फॅसिझमची!
गुणवंत सरपाते
लेखक मूळचे नांदेड चे रहिवासी असून सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

Leave a Reply