आधुनिक भारताच्या सुधारणेचे जनक महात्मा फुले..

विकास परसराम मेश्राम

जातिभेदांचा आणि धर्मभेदांचा धिक्कार करून मानवी समतेचा पुरस्कार करण्यात आपले आयुष्य वेचणार्‍या आणि आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला ललालभूत करणारे महात्मा फुले हे देशातील समाजक्रांतीचे अग्रणी आहेत.

२८ नोव्हेंबर १८९० रोजी महान भारतीय विचारवंत, समाजसेवक, तत्त्वज्ञ आणि लेखक ज्योतिराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथी आहे, जे आपल्या सामाजिक योगदानामुळे आणि समाजहितासाठी संपुर्ण देशातील लोक ओळखतात. , त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव गोऱ्हे होते, नंतर त्यांचे नाव बदलून ज्योतिराव गोविंदराव फुले असे ठेवण्यात आले ते फुले विकत असत . धर्मा तील परखड सत्य समाजासमोर ,आणण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी, तिसरे रत्न, छत्रपती शिवाजी राजा भोंसले यांचा पोवाडा , शेतकऱ्यांचा आसूड , अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर १८९१ मध्ये प्रकाशित झाले. ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी महिला आणि दुर्बल लोकांच्या कल्याणासाठी अनेक कामे केली. वंचित महिला आणि समाजातील सर्व घटकांच्या शिक्षणासाठी सदैव कार्यरत राहीले . ते स्त्री शिक्षणाचे खंबीर समर्थक पुरस्कर्ते होते. हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दलित, महिलांना शिक्षणाची प्रेरणा देत राहिले. त्यामुळे त्यांना भारतात शिक्षणाचे आश्रयदाता म्हटले जाते.मुलगा शिकला तर कुटुंब शिकते आणि मुलगी शिकली तर समाज सुशिक्षित होतो, असे ते म्हणत . त्यांनी जीवनसाथी पत्नी सावित्रीबाई सोबत समाजात अध्यापनाचे कार्य केले.सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.फुले यांनी स्त्री शिक्षण न घेणारी बंधनाची भिंत तोडली, की ज्यामुळे महिला आणि दलितांना शतकानुशतके शिक्षणापासून दूर ठेवले गेले. त्याला समाजातून बहिष्कारालाही सामोरे जावे लागले होते . महात्मा फुले हे जातीभेदाचे कट्टर विरोधक होते. महात्मा फुले मानवी समाजाबद्दल बोलत असत, ज्यामध्ये मानवता आणि समानता, सर्वांसाठी शिक्षण, सर्वांचे हक्क सुनिश्चित केले पाहिजेत. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले. महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आणि महिला शिक्षणासाठी, १८४८ मध्ये एक शाळा उघडण्यात आली, जी देशातील अशी पहिली शाळा होती. आजपासून १७० वर्षांपूर्वी देशात स्त्री शिक्षणाची स्थिती काय असेल, याचा अंदाज लावता येतो, त्या काळी मुलींना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नव्हते, तेव्हा त्यांनी आपल्या पत्नी सावित्री फुले यांना शिकवून शिक्षिका बनवले. यानंतर त्यांनी आणखी तीन शाळा काढल्या, आणि म्हणाले की स्त्री-पुरुष समान आहेत, मग भेदभाव का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर महात्मा फुलेंच्या आदर्शांचा जास्त प्रभाव होता.बाबा साहेबांनी महात्मा फुलेंना आपले गुरू मानले होते.
बाबासाहेब म्हणायचे महात्मा फुले हे आधुनिक भारतातील सर्वात मोठे शूद्र होते ज्यांनी मागास जातीच्या हिंदूंना पुढच्या जातीतील हिंदूंचे गुलाम असल्याची जाणीव करून दिली.त्यामुळे भारतातील लोकांसाठी परकीय राजवटीपासून स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक लोकशाही अधिक महत्त्वाची आहे.
जोतिबा फुले हे समाजाचे खंबीर पहारेकरी होते.ते सदैव स्मरणात राहतील.जाती आणि वैवाहिक संबंधांवर जातीय निर्बंध असेपर्यंत भारतात राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही असे ते नेहमी म्हणत.

महात्मा फुले यांच्या विचारांचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. ते समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी सर्वांना शिक्षणाचा मार्ग सुचविला. समजातील एक शिकलेला व्यक्ती दुसर्‍याला सोबत घेऊन त्याचाही विकास करेल, असे त्यांना अभिप्रेत होते. त्यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
‘विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली,
नितीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शुद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले’
या विचारातून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हक्कासाठी व विषमतेविरुद्घ लढण्यास शिक्षणातून पुढे येईल, असा त्यांचा विश्‍वास होता.

आई मुलांवर जी मूल्ये रुजवते ती त्या मुलांच्या भविष्याची बीजे असतात, त्यामुळे मुलींना शिक्षण देणे गरजेचे आहे.महिला आणि वंचित समाजासाठी शाळांची व्यवस्था करणार असे त्यांनी ठरवले तेव्हा प्रस्थापित जातीयवाद्यानी खूप विरोध केला . त्यावेळी जातीव्यवस्थेच्या भिंती खूप उंच होत्या. दलित आणि महिलांच्या शिक्षणाचे मार्ग बंद झाले अशावेळी महात्मा फुले यांनी सर्व बहुजन दिन दलीत समाजासाठी शिक्षणाचा मार्ग निर्माण करून प्रशस्त केला .११ मे १८८८ रोजी मुंबईतील गोळी वाड्यात राव बहादूर विठ्ठलराव ओनेडकर यांनी महात्मा म्हटले आणि जोतिबा हे बहुजनाचे महात्मा झाले . महात्मा फुले यांच्या संघर्षामुळे आणि संघटनेमुळेच तत्कालीन सरकारने कृषी कायदा केला, मात्र आजही शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे.सिंचनाच्या नावाखाली मोठमोठी धरणे बांधली, पण शेतकऱ्यांना त्यांचे पाणी मिळत नाही.गरिबीत वाढ आहे, त्याला पिकांच्या भावानुसार रास्त भाव मिळत नाही.जोतिबांनी मानवतावादी समाजाची कल्पना केली. त्या पासून आज आपण कोसो दूर आहोत
महात्मा फुलेंचे निधन होऊन जवळ जवळ १३0 वर्षे झालेत. परंतु आजही महाराष्ट्रात समाजाच्या परिवर्तनाचा आराखडा तयार करताना त्यांच्या विचाराचा आधार घ्यावा लागतो. हे त्या विचाराचे माहात्म्य आहे. पण, इतक्या वर्षांनंतर आजही फुल्यांना अभिप्रेत असलेली सामाजिक समता प्रस्थापित झालेली दिसत नाही. समाजात आजही सामाजिक विषमता, धार्मिक बंधने, निबर्ंध दिसून येतात. त्यामुळे महात्मा फुलेंच्या सामाजिक समतेच्या विचारांना तळागाळात पोहचविण्याची गरज जाणवते. त्यातूनच महात्मा फुलेंना अभिप्रेत सामजिक समतेवर आधारित समाजाची निर्मिती होईल.

विकास परसराम मेश्राम
vikasmeshram04@gmail.com

लेखक गोंदिया येथील रहिवासी असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*