लढा समतेचा ~ राजा ढाले

अरे रडता कशाला?
अजून आपल्यातला अखेरचा पुरुष मेलेला नाही
आपला वंशविच्छेद झालेला नाही .
तस पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो
म्हणूनच तो प्रत्येक लढाई ही अखेरचीच निकराची लढाई
समजून का लढत नाही ?
कारण ,
शेवट हा ठरलेला असतो
एकतर लढाई संपेल ,एकतर आपण संपू …
मित्रांनो, हा समतेचा लढा आहे.
अखेरचा एक जरी माणूस उरला,
तरी त्याने समतेसाठी लढले पाहिजे
शेवटी माणूसच उरला नाही,तर समता कुणासाठी ?
म्हणूनच आपण समतेसाठी जगल पाहिजे,लढले पाहिजे
अन्यथा आपण विषमतेत मरणारच आहोत.
मरण जर अटळ असेल,
तर लढा का अटळ असू नये समतेचा ?


राजा ढाले

राजा ढाले हे प्रसिद्ध विचारवंत, लेखक, कवी, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तसेच दलित पँंथर, मास मुव्हमेंट चे संस्थापक होत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*