छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन.

May 18, 2023 Editorial Team 1

फुले शाहू आंबेडकर हे भारताच्या सामाजिक लोकशाही विचारविश्वाचे आधारस्तंभ. पाठ्यपुस्तकं आणि अकॅडेमियाने यांना नेहमी ‘मार्जिन’ चे विचारवंत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. खरंतर बहुजन हिताचा विचार करणारे फुले-शाहू-आंबेडकर हे विचारविश्व या देशाचा मुख्य प्रवाह असायला हवा.चिंतनात रमून विचार करणारा तो विचारवंत या पांडित्यपूर्ण संकल्पनेचा आणि पाश्चिमात्य परंपरेचा प्रभाव म्हणून आपण ‘समाजसुधारक’ […]

No Image

ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा – खुले चर्चासत्र

April 13, 2023 Editorial Team 0

मागील काही काळापासून ब्राह्मणी माध्यमे ही पुरोगामी, समाजवादी बुरखा घालून शोषितांना नवनवीन तथाकथित दलितत्वाच्या थियरी ने नियंत्रित करू पाहत आहेत. ह्या सर्व नरेटिव्ह ची तसेच लादले गेलेल्या तथाकथित विचारवंत यांची समीक्षा करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने भीमाच्या लेखण्या (राऊंड टेबल इंडिया मराठी) आयोजित झूम मीटिंग खुल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आवाहन. […]

एक क्षण महामानवाबद्दल कृतज्ञतेचा!

April 28, 2022 Editorial Team 2

शशांक कांबळे “जयभीम कडक … .. जयभीम कडक” रॅप song ऐकताना स्वतः ला नाचण्यापासून अजिबात आवरता आलं नाही. अगदी बेभान होऊन नाचताना कुठलाच संकोच वाटला नाही. तो उत्साह ती ऊर्जा वेगळीच होती. काय ते गाणं आणि काय ते music …असं वाटलं कि आजच बाबांची जयंती आहे. “”माया भीमानं …. भीमानं […]

अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021

October 18, 2021 Editorial Team 2

‘अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021’ कथा हा एक लोकप्रिय साहित्यप्रकार आहे. एका छोट्याशा कथेतून लेखक खूप काही सांगत असतो. मराठी साहित्य समृद्ध व्हायचं असेल तर लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.भीमाच्या लेखण्या (राऊंड टेबल इंडिया) नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अण्णाभाऊ साठे कथा स्पर्धा – 2021’ चे आयोजन करत आहे. तुम्ही […]

बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

August 28, 2021 Editorial Team 2

(सतत नकारात्मक चष्मे घेतलेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या कानाखाली आवाज काढणारी गेल ऑम्वेट यांची लेखणी. बौद्ध धम्मालाही धर्माच्या चौकटीत बसवून आरोप करणाऱ्या ब्राह्मण आणि देशी सरंजामी यांनी नक्कीच वाचले पाहीजे). माझ्या जीवनाचा हा प्रवास आणि माझी वैचारिक-संशोधनात्मक वाटचाल मला बुद्धाकडे घेऊन गेली. अभ्यासाअंती माझ्या लक्षात आले की, भारतात बुद्ध धम्माच्या प्रभावाची जवळपास […]

विपश्यना एक थोतांड – राजा ढाले

August 12, 2021 Editorial Team 5

१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अभूतपूर्व अशा धम्मक्रांतिनंतर त्या चळवळीला खो घालणारे किंवा त्या वैचारिक क्रांतिला चुकीच्या दिशेने नेणारे असे अनेक प्रवाह, फाटे काही लोकांनी फोडले. त्याचं एक दृश्य स्वरूप म्हणजे सत्यनारायण गोयंका यांनी १९७२ सालापासून सुरू केलेली विपश्यना ही चळवळ. विपश्यना म्हणजे आत पहाणं असा तिचा अर्थ असेल […]

काडीमोड ~ निमित्य अण्णा भाऊ साठेंची जयंती

August 1, 2021 Editorial Team 0

दिवस उगवला.त्याची सोनेरी किरणं नांदगावाकडं धावली.माणसं उठली,त्यांची श्रमशक्ती कार्यक्षम झाली.औताड्याची सखुबाई देवळातून परतली.शंकर जंगम बोलला-‘तुझ्या पोराची रास चांगली आहे,यंदा त्याच्यावर तांदूळ टाकून मोकळी हो.’सखु आनंदली.भीमाचं लगीन करायचं असा तिनं निश्चय केला.सखुचा नवरा एकएकी मेला तेव्हा सखु अवघी 20 वर्षांची होती नि तिच्या पदरी 2 वर्षाचा भीमा होता.झिंग्याएवढं मुल आज ना […]

No Image

ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ५

June 29, 2021 Editorial Team 0

प्रश्न असा की कोणत्या पक्षात तुम्ही सामील व्हावे? अनेक पर्यायी पक्ष आहेत. काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही सामील व्हावे काय? कामगारांच्या उद्दिष्टांना ती मदत करील काय? काँग्रेसपासून स्वतंत्र असा स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही. या माझ्या मताला कामगार पुढाऱ्यांचा विरोध […]

No Image

ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ४

June 26, 2021 Editorial Team 1

कामगारांच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तूम्ही राजकीय उद्दिष्टांसाठीही संघटित झाले पाहिजे. केवळ कामगार संघटनेच्या बळावर मालकांच्या विरोधात कामगार विजयी होऊ शकत नाहीत, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. कामगार संघटनांनी राजकारणात शिरावे की शिरू नये या बद्दल आज दुमत असू नाही. कामगार […]

No Image

ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ३

June 6, 2021 Editorial Team 0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर तुम्हाला तुमच्यावरील अन्यायाचे परिमार्जन करावयाचे असेल तर त्यासाठी तुम्ही संघटन उभारू नये हा प्रश्नच उद्भवत नाही. पुढील प्रश्न असा की तुमच्या संघटनेला कोणते द्येय साध्य करून घ्यावयाचे आहे? तुमच्या उद्योगविषयक हेतूसाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे हे न सांगताही कळण्यासारखे आहे. परंतु प्रश्न असा की या हेतूसाठी […]